सोलापूर : सुमारे ८५० कोटी रुपये खर्चाची बहुप्रतीक्षित उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेची चाचणी यशस्वी झाली असल्यामुळे शहराला आता आठवड्यातून दोन वेळा
पाणीपुरवठा होणे शक्य असल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. शहराची जलकुंभ आणि जलवितरण व्यवस्था अद्ययावत झाल्यावर शहरास रोज पाणीपुरवठा शक्य असल्याचेही गोरे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या आणि तरीही प्रशासन आणि कंत्राटदाराच्या वादामुळे सुमारे सात वर्षे लटकलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे काम एकदाचे पूर्ण झाले आहे. हैदराबादच्या पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीने हे अखेर मार्गी लावले आहे.
तथापि, २०३५ साली शहराची लोकसंख्या १७ लाख एवढी गृहीत धरून १७० एमएलडी क्षमतेची उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी योजना हाती घेण्यात आली. उशिरा का होईना अखेर ही योजना पूर्ण होऊन त्यांची चाचणीही यशस्वी झाली आहे. त्यानंतर गोरे यांनी या योजनेची सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र जुने आणि टाकळी बंधारा येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी कार्यरत आहे. यापूर्वीच्या उजनी सोलापूर एकेरी जलवाहिनी योजनेसाठी पाकणी येथे अस्तित्वात आहे. त्यालाच लगत समांतर जलवाहिनी योजनेसाठी नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, ती जागा वनखात्याची असल्यामुळे कायदेशीर अडचण होती. ही अडचण शेवटच्या क्षणी सोडविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्या समांतर जलवाहिनीचे पाणी वळविण्यात आले आहे.
Leave a Reply