पोलीस दलात DGP राहिलेल्या नवऱ्याचा बायकोनेच खून का केला? मर्डर केसची Inside Story
कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येने सगळ्या देशात खळबळ
उडाली आहे. महत्त्वाच म्हणजे या प्रकरणात मारेकरी, प्रमुख संशयित पत्नीच आहे. ही बातमी पाहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर प्रत्येकजण हाच विचार करतोय की, एक पत्नीने असं का केलं?
कुठल्या परिस्थितीत तिने हे पाऊल उचललं? पत्नीने पतीचीं इतकी निर्घृण हत्या का केली? डीजीपीला संपवणारी त्याची पत्नी, त्याशिवाय दोन्ही मुलं मुलगी आणि मुलाने पोलीस चौकशीत माहिती दिली आहे. पण काही गोष्टी अशा सुद्धा आहेत, ज्या अजून रेकॉर्डवर आलेल्या नाहीत. खरतर याच गोष्टींमध्ये हत्येच खरं कारण दडलं आहे. या हादरवून सोडणाऱ्या प्रकरणातील इनसाइड डिटेल्स समजून
घेऊया.
सर्वप्रथम हे समजून घ्या, माजी डीजीपी ओमप्रकाश यांची हत्या कशी झाली? बंगळुरु पोलिसांनुसार, शनिवारी माजी डीजीपी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण झालं होतं. त्यानंतर ओमप्रकाश आपल्या कारमध्ये बसले व बहिणीच्या घरी निघून गेले. त्यांच्या बहिणीचा सुद्धा घटस्फोट झालाय. ती एका खासगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. रविवारी दुपारी त्यांची मुलगी बहिणीच्या घरी आली. ओमप्रकाश यांची समजूत काढली व त्यांना पुन्हा आपल्या घरी घेऊन आली. घरी आल्यानंतर नवरा-बायकोमध्ये पुन्हा कडाक्याच भांडण झालं. त्यावेळी ओमप्रकाश यांच्यावर पत्नी पल्लवीने 8 ते 10 वेळा चाकू भोसकला. पल्लवीने ओमप्रकाश यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार केले.
‘मॉन्स्टरता कायमस्वरुपी संपवून टाकतं
अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर ओमप्रकाश घरातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते जवळपास 20 मिनिटं जमिनीवर तडफडत होते. पत्नी पल्लवी आणि मुलगी तिथेच होती. त्यांनी ओमप्रकाश यांना तडफडून प्राण सोडताना पाहिलं. ओमप्रकाश यांच्या शरीराची हालचाल थांबल्यानंतर पल्ल्वीने एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली. त्याआधी पल्लवीने दुसऱ्या माजी डीजीपीच्या पत्नीला व्हिडिओ कॉल करुन मॉन्स्टरता कायमस्वरूपी संपवून टाकलं असं सांगितलं. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी पत्नी आणि मुलीला ताब्यात घेतलं. चोकशीनंतर रविवारी दोघींना अटक केली. आयपीएसच्या फॅमिली व्हॉट्स App ग्रुपवर काय उत्तर दिलं?
मूळचे बिहार चंपारणचे असलेले माजी डीजीपी ओमप्रकाश यांनी बंगळुरुमध्ये भरपूर संपत्ती बनवलेली. डीजीपी असताना त्यांनी काली नदीच्या किनाऱ्यावर तीन एकरपेक्षा अधिक जमीन खरेदी करुन भव्य फार्म हाऊस बनवलं होतं. त्याशिवाय बरीच संपत्ती त्यांनी पत्नी आणि मुलीच्या नावावर केली होती. मग प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याची वेळ का आली?. जिथे आपलेच वेरी बनले. त्याचं उत्तर पल्लवीने आयपीएसच्या फॅमिली व्हॉट्स App ग्रुपमध्ये दिलं.
या हत्येमागच अजून एक कारण संपत्ती का?
“पती मला आणि माझ्या मुलीला अपमानित करत आहेत. ते अनेकदा आमच्यावर बंदूत रोखतात व गोळी मारण्याची धमकी देतात” असं मेसेजमध्ये लिहितं होतं. त्याशिवाय या हत्येमागे अजून एक कारण सांगितलं जातय ते डीजीपीच्या संपत्तीशी संबंधित आहे. पूर्व डीजीपी ओमप्रकाश यांचं दांडेली येथे एक फार्म होतं. ते फार्म त्यांनी बहिणींच्या नावावर केलं होतं. त्यानंतर घरात वादावादी सुरु झाली. त्याशिवाय ओमप्रकाश यांच्याकडे बंगळुरुत दोन घरं आहेत. एक फ्लॅट कावेरी जंक्शनवरील प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये आहे, जिथे त्यांची हत्या झाली.
> मुलाचा धक्कादायक आरोप
पूर्व डीजीपींचा मुलगा कार्तिकेशने पोलिसांसमोर वेगळं स्टेटमेंट दिला. त्याने आई पल्लवी व बहिण कृती विरोधात तक्रार दिली. मागच्या आठवड्याभरापासून आईने वडिल ओमप्रकाश यांचा छळ चालवला होता. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत होती. म्हणून वडिल राहत घर सोडून आत्या सरिताच्या घरी निघून गेले. त्यानंतर बहिण कृती तिथे गेली. ती वडिलांची समजूत घालून त्यांना घरी घेऊन आली. वडिलांची हत्या झाली. तेव्हा मलगा कठे होता?
Leave a Reply