महाराष्ट्रासह सोलापूरला देखील अवकळी पावसाने चांगलाच झोडपून काडला …
पण या पावसात सोलापूर शहरातील चार राज्यांना जोडणारा प्रमुख चौक तसेच सोलापूर शहराचा प्रवेशद्वार असणारा मार्केट यार्ड चौकात भले मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही, अस्यातच काल रात्रीपासून अनेक किरकोळ अपघात या चौकात घडले असुन अनेकांना ईजा देखील झाली आहे. जडवाहनांचा वावर मोठ्याप्रमाणात असल्याने या चौकात सारखेच अपघात होत असतात पण जिवघेण्या खड्ड्यामुळे पुन्हा अपघातात वाढ होत असून वेळीच या खड्ड्यात भर टाकून खड्डे विजविले नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. खड्ड्यातुन जिवघेणा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनमधून संतापाची लाट उसळणत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पण जिवघेण्या खड्ड्याचा उपाययोजना कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
Leave a Reply